Kolhapur Flood : पुरग्रस्तांच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांची पदयात्रा, सामूहिक जलसमाधीचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आजपासून पदयात्रा काढून जलसमाधी आंदोलन करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली या ठिकाणाहून ही पदयात्रा सुरू होईल. पाच सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी या ठिकाणी पदयात्रा पोहोचेल. तोपर्यंत पूरग्रस्त नागरिकांना सरकारने दिलासा दिला नाही तर सामूहिक जलसमाधी घेतली जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.