आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळेंकडून रक्तदान, रक्तदानासाठी समाजातील घटक पुढे सरसावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात राजेश टोपे हे पत्रकारांशी बोलत होते. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं टोपेंनी आवाहन केले आहे.
टोपे म्हणाले, तरूण वर्ग हा मोठ्या प्रमाणात रक्तदान करत असतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि एनजीओ बंद होत्या. त्यामुळं रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या आता पाच ते सहा दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे.
टोपे म्हणाले, तरूण वर्ग हा मोठ्या प्रमाणात रक्तदान करत असतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि एनजीओ बंद होत्या. त्यामुळं रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या आता पाच ते सहा दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे.