Raj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special Report

Continues below advertisement

Raj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special Report

निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील,  आज अनेक प्रवेश झाले ही सुरुवात आहे, पुढे बघा काय काय घडते ते मी आता विदर्भात, मराठवाड्यात फिरलो, असंख्य लोक मला भेटले, त्यावेळेस अनेक महाराष्ट्र सैनिक भेटायला येत होते,  माझी विनंती आहेस मला एक खूण माफ करा ज्याने मोबाईल मध्ये कॅमेरा आणला त्याचा खून करायचा आहे, राष्ट्रपतींना विनंती आहे, मी अनेकांना भेटू शकलो नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो,  2006 पक्ष स्थापन केली तेव्हा मी सभेत म्हंटले होते, या जगात खूप कमी व्यक्ती आहेत ज्यांच्या पाया पडावे वाटते,  अशीच एक व्यक्ती काल परवा आपल्यातून निघून गेली ते रतन टाटा यांना आपण श्रद्धांजली देऊ आपल्याकडे एखादा प्रकल्प होत असताना पैसे खायला नाही मिळाले की अनेक अडथळे निर्माण करतात,  ज्यावेळी ते गेले तेव्हा अनेकांना वाटलं की आपल्यातला एक माणूस गेला,  प्रचंड श्रीमंत असूनही त्यांनी कधी आव आणला नाही,  आज काल लग्न समारंभ मध्ये दिसून येतात ना,  तसे यांनी कधी केले नाही, जर तुम्हाला रतन टाटा सारखा सरळ सभ्य माणूस अवतो तर राजकारणी सरळ सभ्य का नाही आवडत ?  खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, विचार सोडून सत्तेत बसायचे हेच सुरू आहे पाच वर्सू,  हे फोडा फोडी असेल धंदे करणारे राजकारणी हवेत,  आज महाराष्ट्राच्या जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा, अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी नव्हती,  हे ह्यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार, ही अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली,  कालची भाषणे, उध्दव सारखे वाघनखं काढताय, अब्दाली आला, हा आला तो आला, अरे महाराष्ट्र बद्दल बोल तिकडे पुष्पाचं वेगळं सुरू आहे, एकनाथ शिंदे,  असा महाराष्ट्र मी कधी बघितलं नाही, शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलं आयुष्यभर,  काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली, मग नारायण राणे झालं,  इतके दिवस झाले, आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात,  भाजपने यांना स्वीकारले तरी कसे ?  अजित पवार यांच्या यायच्या आधी मोदी म्हणाले यांना जेल मध्ये टाकू, यांना तर मंत्री मंडळात टाकले,  हे एवढ्यासाठी होते कारण तुम्हाला गृहीत धरले ही लाडकी बहीण योजना आहे ना, पुढच्या महिन्याचे येतील पण नंतर येणार नाही,  जानेवारी मध्ये महाराष्ट्र साकारणार कडे पगार द्यायला पैसे नाही, महिलांना सक्षम करा, त्यांना काम द्या, कामातून पैसे उभे करतील त्या, त्यांना मार्ग दाखवा, फुकट पैसे कसले देतात शेतकरी कुठे मागतोय फुकट वीज, तो म्हणतोय कमी पैशात द्या,  कोणी फुकट मागत नाहीत यांना सवयी लावायच्या आहेत, एकदा सवय लागली ना की नागडा होणार आहे महाराष्ट्र,  आपण विचार करणार शे की नाही,  यातून हाती काही लागणार नाही, जनतेला विनंती आहे नीट बघा काय सुरू आहे माझी भूमिका आधीच सांगितली होती, धमक पण आहे, मी शब्द देऊ शकतो,  महाराष्ट्रात माझ्या हाताला सत्ता, द्या, प्रत्येकाला काम असेल, pn ते जाती प्रमाणे देणार नाही,  हे आरक्षण होऊ शकत नाही हे सर्वांना माहीत आहे, हे खर बोलण्याचे धाडस राज ठाकरे करतो म्हणून पटत नसेल, एक मराठा समाजच मोर्चा आला होता, त्या सभेला काँग्रेस भाजप शिवसेना सर्व लोक होते, मग अडवले कोणी?  हा फक्त मराठ्यांचा विषय नाही, प्रत्येक जातीचा विषय आहे, कोणीही ही मागणी पूर्ण करू शकत नाही, सर्व जाती प्रत्येक राज्यात डोकं वर काढतील, कोणतीही जात कामाशिवाय राहू नये ही माझी भावना आहे, पण हे लोक खोटं बोलत आहेत,  निवडणुका झाली की बघा हा विषय निघतो का? मराठा समाजाने शिस्तीत मोर्चे काढले होते, इतके शिस्तीचे मोर्चे मी बघितले नाहिवे पण पुढे काय झाले,  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram