Raj Thackeray on UP Bihar Migrants : मुंबईतील नाले कुणाकडे तुंबतात? राज ठाकरेंचा सवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच, राज ठाकरेंनी आक्रमकपणे परप्रांतीयांचा मुद्दा हाती घेतला होता. मधल्या काळात मात्र परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राज ठाकरे काहीसे मवाळ दिसले. मात्र आता राज ठाकरेंचा मोर्चा पुन्हा परप्रांतींकडे वळलाय का? अशी चर्चा आता सुरू झालीय. कारण, यावेळी मुंबईतील नाले कुणामुळे तुंबतात? असा सवाल करत राज ठाकरेंनी परप्रांतीयांना धारेवर धरलंय. त्याचसोबत, मिठी नदीला मगरमिठी कुणाची? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तर आपात्कालीन सुव्यवस्थेवरुनही राज ठाकरेंनी टोलेबाजी केलेय.