Raj Thackeray on Na Dho Mahanor : ना. धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं

Raj Thackeray on Na Dho Mahanor : ना. धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं

"ना.धो. महानोर ह्यांचं आज निधन झालं. बहिणाबाई चौधरी आणि बालकवी ह्यांच्या कवितेचा वारसा ना.धो. नी समृद्ध केला. ना.धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ ही आणि अशी अनेक ना.धों. महानोरांची गीतं महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.  २०१९ ला माझ्या एका भाषणानंतर ना.धो. नी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जे लिहिलं होतं, ती माझ्या आयुष्यात मला मिळालेली मोठी पोचपावती. ना.धो. महानोरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन." अशा शब्दात राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola