Rahul Gandhi vs Fadnavis : राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप, पाहा नेमकं काय म्हणाले...

राहुल Gandhi यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय Election Commission वर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रमध्ये तब्बल चाळीस लाख संशयित मतदार असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटक आणि महाराष्ट्रात पाच पद्धतीने मतांची चोरी झाल्याचा दावा राहुल Gandhi यांनी केला. निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांचे डिजिटल डेटा आणि मतदान केंद्राचे CCTV फुटेज मागवले, मात्र ते दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपांनंतर कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांनी काँग्रेस शिष्टमंडळाला आज दुपारी एक ते तीन दरम्यान दिल्लीमध्ये भेटीसाठी बोलावले आहे. राहुल Gandhi यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रात मतांची चोरी झाली नाही, तर राहुल Gandhi यांच्या डोक्यातली चिप चोरीला गेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे, असे फडणवीस म्हणाले. भाजपने राहुल Gandhi यांच्या आरोपांचे खंडन केले असून, संबित पात्रा यांनी 'माझे शब्दच पुरावे आहेत' या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संबित पात्रा यांनी राहुल Gandhi यांना 'नकली Gandhi' असेही संबोधले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola