Prithviraj Chavan : 'युवकांच्या रेट्यामुळे, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे कंत्राटीचा जीआर मागे'

सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय युवकांच्या रेट्यामुळे, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे मागे घेतला. त्यांनी चूक सुधारली ही चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला होता, असा दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola