पाकिस्तानचे पंंतप्रधान Imran Khan यांच्याकडून भारताचं कौतुक, भारताचं परराष्ट्र धोरण लोकहिताचं
abp majha web team
Updated at:
21 Mar 2022 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी पाकिस्तानमधून राजकीय संकटात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सापडलेत.. आणि त्यामुळे त्यांची खुर्चीही धोक्यात आलीए... आणि म्हणूनच की काय इमरान खान यांना भारत आठवलाय... याचं कारण आज पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताचं भरभरुन कौतुक केलं... भारताचं परराष्ट्र धोरण लोकहिताचं आहे असं इमरान खान म्हणाले...रशियावर निर्बंध असतानाही भारत रशियाकडून इंधन आयात करतोय.. शिवाय अमेरिकेसोबतही भारताचे संबंध चांगले असल्याचं इमरान खान म्हणाले... दरम्यान भारतावरील स्तुतीसुमनंही इमरान यांच्यावर महागात पडलीए याचं कारण विरोधकांनी आता या मुद्द्यावरुन इमरान खान यांच्यावर सडकून टीका केलीए..