POLITICS : राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, लॉकडाऊनबाबत परस्पर विरोधी माहिती, प्रवीण दरेकरांची टीका
महाराष्ट्र सरकारला झटका आला की लॉकडाऊनची घोषणा केली जाते, सरसकट लॉकडाऊन त्या ठिकाणी करू नये कारण लोकं कुठेतरी आता स्थिरावत आहेत, आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन केले तर लोक उपासमारीने मरतील आणि म्हणून तुम्हाला लॉकडाऊन करायचा असेल तर त्याच्या अकाउंटमध्ये पहिले पाच हजार रुपये टाका आणि करा. आमच्या या भूमिकेला काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी समर्थन दिले आहे, त्यामुळे लॉकडाउन करण्यापेक्षा नियमावली कडक करण्यात येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.