Maharashtra LIVE Superfast News : 8 NOV 2025 : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळा (Pune Land Scam) प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणात पार्थ पवार (Parth Pawar), शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका करताना म्हटले आहे की, 'तुम्ही हातपाय न हलवता जमीन मिळाली नाही तुम्हाला?'. या प्रकरणी शरद पवार यांनी 'कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं' अशी भूमिका घेतली आहे, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर मीरा भाईंदरमध्ये २०० कोटींची जागा ३ कोटीत लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल करत 'वोटबंदी'चे आवाहन केले आहे, तर बच्चू कडू यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी सातारा गॅझेटियर लवकरच लागू होणार असल्याचे संकेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement