Narayan Rane vs Uddhav Thackeray : काही लोकांचा स्तर खाली गेला आहे : Jayant Patil ABP Majha

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. यावर Jayant Patil यांनी राणेंनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह, राजकारण नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram