PM Modi Metro 3 | काही लोकांना सेवेपेक्षा राजकारण महत्त्वाचं - मोदी
Continues below advertisement
मेट्रो तीन च्या प्रकल्पाच्या एका टप्प्याचे उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. भाषणादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात एक अशी राजकीय धारा राहिली आहे, जी जनतेच्या सुविधेला नाही, तर सत्तेच्या सुविधेला प्राधान्य देते. यामुळे देशाला अनेक दशके नुकसान सोसावे लागले आहे. आज ज्या मेट्रो लाईनचे लोकार्पण झाले आहे, ती अशा लोकांच्या कारनाम्यांची आठवण करून देते, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासोबतच, या राजकीय टीकेने कार्यक्रमाचे लक्ष वेधून घेतले. जनतेच्या हिताऐवजी सत्ता टिकवण्याला महत्त्व देण्याच्या वृत्तीवर त्यांनी बोट ठेवले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement