Parth Pawar Land Scam: 'भूखंडाचं श्रीखंड कोणी खाल्लं?', Ajit Pawar यांच्या राजीनाम्यासाठी Thackeray गट आक्रमक
Continues below advertisement
पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांवरून राजकारण तापले आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत पुण्यामध्ये आंदोलन केले. ‘अजित पवार आणि महसूलमंत्र्यांनी या प्रकरणात राजीनामा द्यावा’, अशी अपेक्षा ठाकरे गटाने व्यक्त केली आहे. ‘भूखंडाचं श्रीखंड कोणी खाल्लं?’ असा सवाल करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. पार्थ पवार यांच्या कंपनीवर सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, दोन अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. पार्थ पवार यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement