Students Protest | परभणीतील आंदोलनातील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय? | ABP Majha

लातूर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं लोण आता परभणीत पोहचलंय. लातूरनंतर परभणीतल्या कृषी विद्यापीठातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी कालपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलंय. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहांची फी, परीक्षेचे निकाल वेळेवर लागावे यासह २२ मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झालेत. विद्यापीठ स्तरावरील २२ पैकी १७ मागण्या विद्यापीठानं मान्य केल्यात. मात्र, राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या ५ मागण्यांवर ठाम राहून विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरुच आहे. जोपर्यंत राज्य शासन मागण्या मान्य करत नाही, तोवर आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola