Pankaja Munde On Manoj Jarange : जरांगेंविरोधात बोलले नव्हते, पंकडा मुंडेंनी सांगितला लोकसभेत काय झालं?

Continues below advertisement
बीडमधील भाजपच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला, असे सांगत त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजात सलोखा राखण्याचे आवाहन केले. 'मराठा आणि ओबीसी समाजातली दरी तोडूया,' असे थेट आवाहन त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही मी खचले नाही आणि मला कोणत्याही पदाचा मोह नाही, असेही त्या म्हणाल्या. मुंडे यांनी दोन्ही समाजातील तेढ कमी करण्याच्या गरजेवर जोर दिला, जो राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola