Farmer Loan Waiver | या गतीने संपूर्ण कर्जमाफीला 400 महिने लागतील : देवेंद्र फडणवीस | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्थसंकल्पीय अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. सभागृहाबाहेर आणि सभागृहातही भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर विरोधकांकडून विधानसभेचं कामकाजाला दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोन महिन्यात केवळ 15 हजार शतकऱ्यांची यादी लावली असून सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिलं आहे. ठाकरे सरकारकडून महिन्याला फक्त साडेसहा हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आलं आहे. या गतीने कर्जमाफी दिली तर अनेक वर्षे कर्जमाफीसाठी लागतील असा टोलाही फडणवीसांनी सरकारला लगावला.