
Onion Farmers : अनुदान मिळवण्यासाठी जाचक अटींमुळे कांदा उत्पादक अडचणीत
Continues below advertisement
Maharashtra Farmers Issue: शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतल्याची घोषणा करायची. मात्र, त्याचवेळी अटी शर्तींमुळे त्यांना मदतही मिळणार नाही, याची काळजीदेखील सरकार घेत असल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. सलग पाच दिवस किमान दहा मिलिमीटर पाऊस झाल्यास त्या परिमंडळामध्ये अतिवृष्टी झाली असे गृहीत धरून भरपाई देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे. मात्र वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटले.
Continues below advertisement