City 60 Superfast News : सिटी सिक्स्टी : Maharashtra News : 17 OCT 2025 : ABP Majha

Continues below advertisement
बीडमधील ओबीसी महाएल्गार सभा आणि शरद पवारांनी पुकारलेल्या 'काळी दिवाळी' आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातला हैदराबाद गॅझेटियरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. 'जीआर रद्द होणार नाही तोपर्यंत ओबीसी शांत बसणार नाहीत, निवडणुकीत सरकारला ओबीसींच्या रोषाला सामोरं जावं लागेल', असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला आहे. दुसरीकडे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या ₹31,000 कोटींच्या पॅकेजवरून शरद पवारांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे. सरकारने शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे. तर, ज्यांच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या तेच काळी दिवाळी साजरी करत आहेत, असा टोला भाजपचे केशव उपाध्ये यांनी पवारांना लगावला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola