Ratnagiri : रत्नागिरीमध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा ABP Majha
जातीनिहाय जनगणना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण या मुद्यावर आज रत्नागिरीत ओबीसी समाजानं मोर्चा काढलाय. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची मागणी राज्य सरकारकडे केलीय. या मोर्चात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर हेदेखिल उपस्थित होते. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा झाल्याचं सामंत यांनी सांगितलं. तसंच ओबीसी जनगणनेसाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचंही सामंत म्हणाले.