Manoj Jarange Elgaar : ...तर आता सरकारला एक तासही देणार नाही, जरांगेंचा इशारा
मागास सिद्ध होऊनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केलीये. मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण देताना कोणते निकष पाळले होते असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला आता एक तासही जादा देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.. जरांगे पाटलांनी आज इंदापूर, शिखर शिंगणापूर आणि अकलूजमध्ये भव्य सभा घेतली.. थोड्याच वेळात अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये आणखी एक सभा होणार आहे...