Raigad : रायगड जिल्ह्यातल्या जवळपास दीड हजार शाळांमध्ये बत्ती गुल, 50 लाखांची वीजबिल थकबाकी
आता एक धक्कादायक बातमी आहे रायगड जिल्ह्यातून ... रायगड जिल्ह्यातल्या जवळपास दीड हजार शाळांमध्ये बत्ती गुल झाली आहेत. या साळांची वीजबिलाची जवळपास ५० लाखांची थकबाकी असल्यानं वीज वितरण विभागानं या शाळांची वीज तोडलेय. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार ६७९ शाळांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आलाय. तर ८७० शाळांवर वीज तोडणीची तात्पुरती कारवाई करण्यात आलये. आधीच दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्यायतत... त्यातच आता शाळांसमोर वीजेचं संकट उभं ठाकलंय.