Sharad Pawar | मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाही : शरद पवार
अजित पवार नाराज, प्रदेशाध्यक्ष बदलणार ते कोणाचं मंत्रिपद जाणार या सर्व चर्चना शरद पवार यांनी उत्तर दिलं. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरुये. त्यांना नाथाभाऊंची साथ मिळाली. कोरोनामुळे अजित पवार काळजी घेत आहेत. जे मंत्री आहेत ते तसेच असतील, बदल नाही. एक शब्दाने त्यांनी कसली अपेक्षा आहे, काय हवं असं नाथाभाऊ बोलले नाही. त्यांनी काहीच मागणी केली नाही. कोण मंत्री आहेत ते तसेच राहतील.जयंतराव यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करत आहे. अजित पवार नाराज, कशाला नाराज.. कोरोना काळात काळजी घ्यावी लागते. जनतेशी बांधिलकी आहे. जितेंद्र आव्हाड, मुंडे, बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाला सगळ्यांच्या बाबत काळजी घेत आहोत. अधिक खबरदारी घ्यावी म्हणून सहकारी आले नाही तर काही गडबड नसल्याचे सांगत पवारांनी सर्व चर्चांवर पडदा टाकला.