Goon Raj: 'खंडणीसाठी Nilesh Ghaywal च्या गुंडांचा धुमाकूळ', तरीही Police गुन्हा का दाखल करत नाही?
Continues below advertisement
धाराशिवच्या (Dharashiv) भूम तालुक्यात पवनचक्की कंपनीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. खंडणीसाठी (Extortion) गुंड निलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal) साथीदारांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. 'तोडफोड करणाऱ्या गुंडांना कुणाचा पाठिंबा आहे आणि कंपनी कुणाच्या दहशतीखाली मौन बाळगून आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय'. चार महिन्यांपूर्वी पवनचक्की कंपनीची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती, मात्र कंपनीने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे, गुंडांना राजकीय पाठिंबा असल्याचा आणि कंपनीवर दबाव असल्याचा संशय बळावला आहे. पोलिसांनी कंपनीच्या तक्रारीची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितल्याने या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement