NCP Crisis : पक्षाबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रीय समितीलाच, राष्ट्रवादीच्या घटनेत तरतूद

Continues below advertisement

NCP Crisis : पक्षाबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रीय समितीलाच, राष्ट्रवादीच्या घटनेत तरतूद

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत भाजपची (BJP) कास धरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) वरच्या फळीत सामील होणारे अजित पवार काल (रविवारी) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील झाले. त्यामुळे आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तसेच, राज्याचा गाडा आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार हाकणार आहे. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. 

शपथविधीनंतर अजित पवारांनी दावा करत म्हटलं की, आम्हाला पक्षाचाही पाठींबा आहे. तसेच, पक्षाचं नाव, पक्षचिन्हही आमच्याकडेच आहे, तसेच आम्ही याच नावावर आणि चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला की, राष्ट्रवादीतील 53 पैकी 40 आमदारांचा राज्य सरकारला पाठींबा आहे. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील पक्षीय बलाबलही बदललं आहे. आधी एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर अजित पवारांचं राष्ट्रवादीतील बंड यामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट)- अजित पवार (राष्ट्रवादी गट) यांना पाठींबा असणाऱ्या आमदारांची संख्या आणि शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना पाठींबा असलेल्या आमदारांची संख्या किती ते पाहुयात... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram