#HomeMinister अनिल देशमुख यांना राजीनामा देण्याची गरज नाही, पक्षाकडून भूमिका स्पष्ट - नवाब मलिक

परमबीर सिंह दिल्लीत गेले आणि लेटरबॉम्बचं षडयंत्र रचलं गेलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्र्यांना भेटून तक्रार केल्याचा परमबीर सिंह यांचा दावाही मलिक यांनी फेटाळला. देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही हा पक्षाचा निर्णय आहे, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं. राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जातोय असा आरोपही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola