Navi Mumbai : नवी मुंबईतील 500 चौरस मीटरपेक्षा मोठे  भूखंड सुरक्षित राहणार : ABP Majha

भाजप नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून केलेल्या टीकेनंतर राज्याच्या नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिकेला मोठा दिलासा दिला आहे. नवी मुंबई शहरातील ५०० चौरस मीटर पेक्षा मोठे असलेले भूखंड सुरक्षित राहणार आहे. 500 चौरस मीटर पेक्षा मोठ्या भूखंडावर महानगर पालिकेने आरक्षण न टाकता त्यावर सिडकोचा अधिकार राहील असा आदेश  नगरविकास खात्याने काढला होता. या आदेशाविरोधात न नवी मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. विधीमंडळ अधिवेशनातही या प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola