National Unity Day: 'वंदे मातरम'वरून नवा वाद, PM मोदींचा काँग्रेसवर थेट आरोप Special Report
Continues below advertisement
राष्ट्रीय एकता दिनी (National Unity Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'वंदे मातरम' (Vande Mataram) वरून काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला चढवला, तर महाराष्ट्रात अबू आझमी (Abu Azmi) यांच्या विरोधामुळे वाद पेटला आहे. 'ज्या दिवशी काँग्रेसने वंदे मातरम तोडण्याचा, कापण्याचा, विभाजित करण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी काँग्रेसने भारताच्या विभाजनाची पायाभरणी केली होती,' असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी केला. गुजरातच्या केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीला झालेल्या विरोधात 'वंदे मातरम' कसे देशाच्या एकतेचे प्रतीक बनले होते, हे त्यांनी सांगितले. काँग्रेसनेच धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम'चा एक भाग काढून टाकला आणि इंग्रजांचा अजेंडा पुढे नेला, असा दावाही मोदींनी केला. यावरून आता बिहार विधानसभा आणि महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement