Nashik Godavari River : नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

नाशिक जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, तरीही प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सकाळपासून गोदाकाठावरचे धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत. सध्या गंगापूर Dam मधून ४१५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, जिल्ह्यातील एकूण १४ धरण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, नागरिकांनी नदीकाठी आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. धरणांमधील उच्च पाणीसाठ्यामुळे आणि सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील काही दिवस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola