Narayan Rane : 'ठाकरे सरकार फसवाफसवीचे धंदे करतंय', नारायण राणेंची टीका

 

भाजप खासदार नारायण राणे म्हणाले की, अन्य राज्यांमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली, मग महाराष्ट्रात का वाढते आहे? या मुख्यमंत्र्यांनी या सरकारने नक्की काय केलं? आता सगळीकडून उठाव होऊ लागल्याने घाबरले आहेत. यांना लॉकडाउनची धमकी देण्याचा अधिकार आहे का? नागरिकांना शिस्त पाळा नाहीतर आम्ही लॉकडाउन सुरू करू, असं सांगत आहेत. हे राज्य काय तुम्ही विकत घेतलं आहे का? नागरिकांशी बोलताना मान, सन्मान देऊन मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवं. कोरोना संसर्ग वाढला म्हणून लॉकडाउन करणं हे राज्याला आता पेलवणारं नाही. आज बेकारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गावी गेलं तरी हीच परिस्थिती आहे. सर्व उद्योग-धंदे कोलमडले आहेत, याची चिंता राज्य सरकारला आहे की नाही? हे सरकार फसवाफसवीचे धंदे करत आहे.”

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola