Navi Mumbai Airport ला दि.बा.पाटलांचं नाव द्या, बाजूच्या गावांचं पुनर्वसन करण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
04 Jan 2022 09:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे प्रणेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासोबतच, विमानतळाच्या निर्मितीसाठी होणाऱ्या दगडमातीच्या भरावामुळे सभोवतालच्या गावांत पाणी साचत असून, त्यांचे पुनर्वसन करावे. तसेच, प्रकल्पग्रस्तांच्या नवीन बांधकामाना परवानगी आणि पूर्ण झालेल्याना भोगवटा प्रमाणपत्र सिडकोने देण्यास सुरुवात करावी. अन्यथा, विमानतळाचे काम बंद करण्यासाठी प्रखर आंदोलन करणार असल्याचा इशारा, 27 गाव विमानतळ प्रकल्पबाधित कृती समितीने आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.