EVM Controversy: मतचोरीवरून विरोधक आक्रमक, मुंबई पालिकेवर भव्य मोर्चा, मार्ग कसा असणार?
Continues below advertisement
मुंबईत (Mumbai) आज विरोधकांनी मतचोरी (Vote Theft) आणि ईव्हीएम (EVM) विरोधात भव्य मोर्चा काढला आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) एकत्र आले आहेत. 'भारतातील ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स आहे, कोणालाही त्याची तपासणी करण्याची परवानगी नाही,' असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थित केला आहे. हा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयाजवळ संपणार आहे. मतदारयाद्यांमधील गोंधळ आणि ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत, निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'हा प्रामाणिक मतदारांचा अपमान आहे' असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिका परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement