EVM Row: 'ही तर वोट चोरी... मतदार कुठे मतदान करणार हे विचारणार?', Uddhav Thackeray आयोगावर संतापले
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा वादळ, मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएमच्या (EVM) मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे (MVA) नेते आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) धारेवर धरलं. 'दुबार नाव असेल तर त्या मतदाराला विचारू की तुला कुठे मतदान करायचंय, पण नाव डिलीट करण्याचा अधिकार नाही', आयोगाच्या या उत्तरावर विरोधकांनी 'ही तर वोट चोरीची सुरुवात आहे' असा संतप्त सवाल केला. यावेळी राज ठाकरे यांनी 'निवडणुका लागलेल्या नाहीत तर मतदार नोंदणी बंद का केली?' असा प्रश्न केला, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'व्हीव्हीपॅटशिवाय (VVPAT) निवडणुका कशा घेता?' म्हणत आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. निवडणूक आयोगाने मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत बदल करण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले असून, विरोधकांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement