Zero Hour : बीडमध्ये 'बाप चोरणारी टोळी' आली का? मुंडे मामांचा थेट सवाल ABP Majha
Continues below advertisement
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसा हक्कावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या वादात पंकजा मुंडे यांचे मामा आणि नेते प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'बीड जिल्ह्यात बाप चोरणारी टोळी आली का?', असा थेट सवाल प्रकाश महाजन यांनी बीडमधील सभेच्या आयोजकांना विचारला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा ९० टक्के ओबीसी समाज पंकजा यांनाच आपला राजकीय वारस मानतो, असा दावा महाजन यांनी केला. छगन भुजबळ यांनी बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार असल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना, भुजबळ तुरुंगात असताना पंकजा मुंडे त्यांना भेटायला गेल्या होत्या, याची आठवण महाजन यांनी करून दिली. त्यावेळी पंकजा यांचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या भुजबळांनी आता बीडमध्ये येऊन वेगळी भूमिका का घेतली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement