JNU Violence | जेएनयूमधील हल्ला उत्तम कायदा-सुव्यवस्थेचं लक्षण नाही : संजय राऊत | ABP Majha
देशाच्या राजधानीमध्ये कधी पोलीस विद्यापीठात जाऊन गोळ्या चालवतात, तर कधी बुरख्यामधील हल्लेखोर जाऊन विद्यापीठांमध्ये धुडगूस घालतात आणि रक्तपात करतात. उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेचा हे लक्षण नाही. सरकारमधील लोक हे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारख्या कामांमध्ये गुंतलेले आहेत. मात्र या देशातील विद्यार्थी सुरक्षित नसेल, तर हा देश सुरक्षित राहणार नाही, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.