Mumbai Hostage Crisis: 'पोलिसांनी मुलांची शपथ घेतली', Powai स्टुडिओतील थरारनाट्याची इनसाइड स्टोरी!
Continues below advertisement
पवई (Powai) येथील स्टुडिओमधील ओलीस नाट्य (Hostage Drama) अखेर संपले असून, यात रोहित आर्य (Rohit Arya) या व्यक्तीने मुलांना ओलीस धरले होते. 'ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडविण्यासाठी पोलिसांनी आपल्या मुलांची शपथ घेतली होती', अशी माहिती आता समोर आली आहे. तब्बल दीड तास पोलीस आणि पालकांकडून रोहित आर्याचं मन वळविण्याचे प्रयत्न सुरू होते. पालकांनी व्हिडिओ कॉल करूनही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, रोहित ऐकत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अखेरीस, त्याला बोलण्यात व्यस्त ठेवून पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओत प्रवेश केला आणि मुलांची सुखरूप सुटका केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement