Maharashtra Government | अधिकारी सरकारला जुमानत नाहीत : आशिष शेलार
राज्य सरकारचे ८ प्रशासकीय अधिकारी एका बड्या उद्योजकाच्या गाड्या खाजगी आणि सरकारी कामासाठी वापरत असल्याची तक्रार बड्या मंत्र्यांनं मुख्यमंत्र्यांकडे केल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. सरकारला अधिकारी जुमानत नाहीत, उद्योजक सरकार चालवत आहेत, अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलारांनी केलीय.