Mohan Bhagwat :किल्ले रायगडावरील समाधी टिळकांनी शोधली, भागवतांच्या वक्तव्यानं नवा वाद
जयदीप मेढे
Updated at:
10 Sep 2024 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMohan Bhagwat :
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली आणि रायगडावर उत्सव सुरू केल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. त्यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरसंघचालकांवर टीका केलीय. मोहन भागवतांची भूमिका दिशाभूल करणारी असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली हा इतिहास बदलता येणार नाही, असं छगन भुजबळांनी म्हटलंय.