MNS vs Congress : काँग्रेसचा मनसेला नकार, अविनाश अभ्यंकर म्हणाले..आम्ही हात पसरले का?
Continues below advertisement
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या मित्रपक्षाची गरज नाही, असे सपकाळ यांनी सांगितले. संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनाकरिता तसेच भाजपच्या दंडेलशाहीविरोधात लोकशाही वाचवण्यासाठी आणि मोदींना हटवण्यासाठी India Alliance आणि महाविकास आघाडी गठीत झाली आहे. या संदर्भात नवीन येणाऱ्या मित्रपक्षाचे काय म्हणणे आहे याची स्पष्टता येणे प्राथमिक गरज आहे, असे सपकाळ म्हणाले. मात्र, "अभी दिल्ली बहुत दूर आहे," असेही त्यांनी नमूद केले. यावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रतिक्रिया दिली. "आम्ही कोणाकडे हात पसरला का?" असा सवाल त्यांनी केला. आघाडीमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा अंतिम निर्णय Raj Thackeray घेतील, असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. तसेच, राजसाहेब Thackeray आणि Uddhavji यांच्यातील भेटीगाठी अराजकीय आणि कौटुंबिक आहेत, असेही अभ्यंकर म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement