Avinash Abhaynkar On Voter: मतदार याद्यांतील गोंधळाविरोधात 'सत्याचा मोर्चा', निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Continues below advertisement
मनसे (MNS), शिवसेना (UBT), काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी एकत्र येत मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला आहे. या मोर्चाचा मुख्य उद्देश मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळ आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) संशयास्पद कार्यपद्धतीवर आवाज उठवणे हा आहे, असे मनसे नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी म्हटले आहे. 'हा मोर्चा सत्तेसाठी नसून, मतदान पारदर्शक व्हावे आणि मतदारांच्या मताला न्याय मिळावा यासाठी काढलेला सत्याचा मोर्चा आहे,' असे अभ्यंकर यांनी सांगितले. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यापूर्वीच एका सादरीकरणात मतदार याद्यांमधील हजारो त्रुटी समोर आणल्या होत्या. 'मतदार यादी शुद्ध करा, नाहीतर तुमच्या निवडणुका तीन-साडेतीन वर्षे झालेल्या नाहीत, अजून पुढे घ्या,' असा इशाराही अभ्यंकर यांनी दिला. हा शेवट नसून सुरुवात असल्याचे सांगत राज ठाकरे (Raj Thackeray) या मोर्चात काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement