Sanjay Gaikwad Canteen Case: गुन्हा दाखल तरी मला पश्चाताप नाही म्हणत संजय गायकवाडांची मगरुरी कायम!
Continues below advertisement
मुंबईत मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड यांच्याविरोधात चौसष्ट तासांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकृष्ट जेवणावरुन गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातल्या कँटीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या घटनेचा एबीपी माझाने गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. बीएनएस कलम तीन शे बावन्न (अपमानित करणे), बीएनएस कलम शंभर पंधरा (मारहाण करणं) आणि कलम तीन शे पाच (संगनमत करुन मारणं) ही कलमे गायकवाड यांच्यावर लावण्यात आलेली आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतरही गायकवाड यांची मगरुरी कायम आहे. 'मी केलेलं आहे, मला पश्चाताप नाहीये, मी मारहाण केलेली आहे पण मी काही जीवघेणी मारहाण केलेली नाही। सौम्य मारहाण माजी आहे त्या कायद्यात तरतुदीत जो गुन्हा असेल तो त्यांनी माझ्यावर दाखल करा। आई डोंट केअर। अदखलपात्र गुन्हा आहे हा,' असे गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे. दरम्यान, गायकवाडांवरील कारवाईवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच दुमतेपासा पाहायला मिळत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गायकवाडांविरुद्ध कुणीही तक्रार केलेली नाही त्यामुळे कारवाई करता येणार नाही असे म्हटले होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा दावा खोटा ठरवला. तक्रार दाखल झाली नाही तरी कारवाई करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे आणि कॉग्निजेबल ऑफेंस असेल तर पोलीस योग्य कारवाई करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी या मारहाणीवर विधानभवनाच्या हॉस्टेलमध्ये झालेल्या घटनेवर अध्यक्षांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement