Mega Morcha: 'ही सत्याची लढाई, खोट्या मतदारांची नाही', Sharad Pawar, Uddhav आणि Raj Thackeray रस्त्यावर
Continues below advertisement
मुंबईत बोगस मतदार याद्यांच्या (Fake Voter Lists) मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी 'सत्याचा मोर्चा' (Satyacha Morcha) काढत सरकारला घेरलं. या मोर्चात शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे प्रमुख नेते एकत्र आले. 'ही सत्तेची लढाई नाही, ही सत्याची लढाई आहे, ही खऱ्या मतदारांची लढाई आहे, खोट्या मतदारांची नाही,' असा संदेश या मोर्चातून देण्यात आला. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा या मोर्चाचा मार्ग होता. मात्र, या विरोधी एकजुटीत महाविकास आघाडीचा (MVA) घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या (Congress) अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी 'कार्यकर्ते सहभागी झाले म्हणजे आम्ही झालो' असे सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची अनुपस्थिती आघाडीमध्ये मतभेद असल्याची स्पष्ट चिन्हे देत आहे. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सावध भूमिका घेत असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement