MBBS Exam : एमबीबीएसच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गाच्या परीक्षा जूनमध्ये होणार

एबीपी माझा वेब टीम Updated at: 26 Apr 2021 08:07 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App





 राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व आहे. त्याचे व्याप चार पटीने जास्त आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणं स्वाभाविक आहे. मात्र आता 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे आणि स्थिती सुधारत आहे हे संकेत दिलासादायक असून लॉकडाऊनचे सकारात्मक संकेत असल्याचे देशमुख म्हणाले.




कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य सरकारने अत्यंत कमी वेळेत रुग्णालयात सोयी वाढवल्या, शेकडो खाटा असलेल्या कोविड केअर सेंटर उभारले. ऑक्सिजनयुक्त खाटाही वाढवल्या त्यामुळे आता महाराष्ट्रात हळू हळू स्थिती नियंत्रणात येत आहे. त्याच प्रमाणे नागपुरात ही स्थिती हळू हळू सुधारत दावा देशमुख यांनी केला. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे, परदेशातून लस आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत.लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. हे कोरोना विरोधातल्या लढाईत महत्वाचे आहे असे अमित देशमुख म्हणाले. 




 




 

TRENDING VIDEOS

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.