Marathwada Lumpy Virus : मराठवाड्यातील चार जिल्ह्यात लम्पीचं थैमान,3 हजार 672 जनावरांचा मृत्यू
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये लम्पीने पुन्हा डोकं वर काढलंय. औरंगाबाद, बीड, परभणीसह जालना जिल्ह्यांत आतापर्यंत तीन हजार ६७२ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झालाय. तर या चार जिल्ह्यांतील एक हजार 499 गावांतील 52 हजार 531 जनावरांना लम्पीची लागण झालीय. दरम्यान, सर्व जनावरांचं लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, जनावरांभोवती लम्पीचा विळखा सैल होताना दिसत नाहीय.