Maratha Reservation | मंत्री Vikhe Patil, Uday Samant आज Jarange Patil यांना भेटणार, मुंबईकडे कूच
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे आज मनोज जरांगे पाटील यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जरांगे पाटील हे शेकडो मराठा बांधवांसोबत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत पोहोचण्यापूर्वी सरकारकडून त्यांच्यासोबत बोलण्यासाठी मंत्री विखे पाटील आणि उदय सामंत त्यांना भेटतील. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन स्थगित करावे अशी विनंती करण्यात आली आहे. शासनाची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलेली आहे आणि सरकारने नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे. पुणे किंवा अहिल्यनगर या ठिकाणी या दोन्ही मंत्र्यांची जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा होऊ शकते. एबीपी माझला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. "आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे," असे म्हटले आहे. हे आंदोलन शेवटपर्यंत करण्याचा त्यांचा अधिकार आहे, यावर कोणताही आक्षेप नाही, असेही नमूद केले आहे.