Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनाबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार
मनोज जरांगे यांच्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून ते गोदापट्ट्यातील १२३ गावांच्या गाठीभेटी दौरा करणार आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील काही निवडक गावांना ते भेट देणार आहेत.या दौऱ्यात त्यांच्या कोणत्याही सभेचं नियोजन नसून गावातील मराठा समाज आणि आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. तसंच मुंबईतील आंदोलनाबाबत ते गावकऱ्यांना मार्गदर्शन करतील.