Manoj Jarange : मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत, म्हणून CM-DCM यांचं षडयंत्र
मराठा समाजाच्या मुलांचं भलं होऊ नये, असं सरकारचं षडयंत्र आहे. त्याचसाठी आरक्षण दिलं जात नाहीये, असा गंभीर आरोप उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केलाय. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना गरिबांची गरज उरलेली नाही, अशीही टीका त्यांनी केली. दरम्यान २९ ऑक्टोबरला मराठा आंदोलनकर्त्यांची बैठक घेत जरांगे पुढील दिशा ठरवणार आहेत..