Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
Continues below advertisement
मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 'नुकसानीची शंभर टक्के भरपाई द्यायची नसेल तर ताकदीने आंदोलन लावून धरणार', असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यासोबतच, कोरोना काळात उभारण्यात आलेले ३०० हून अधिक ऑक्सिजन प्लांट धूळखात पडून असल्याने शासनाच्या योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय घडामोडींमध्ये, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला असून, ही जबाबदारी आता इंद्रनील नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच, महाविकास आघाडी आणि मनसेचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची पुन्हा भेट घेणार आहे, मात्र शरद पवार या भेटीला उपस्थित राहणार नाहीत. मध्य रेल्वेने दिवाळीची गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील सहा प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement