Manoj Jarange : कोणताही तोडगा निघालेला नाही, मराठा बांधवांनो 20 तारखेला मुंबईला जायचंच
कुणबी प्रमाणपत्रांबाबतच्या या घडामोडीनंतरही जरांगे मात्र मुंबई मोर्चावर ठाम आहेत. मराठा बांधवांनो २० तारखेला मुंबईला जायचच, अशी फेसबुक पोस्ट जरांगेंनी लिहिली आहे. राज्य सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही, असं अतिशय ठळक अक्षरात आणि प्रत्येक शब्दाला हॅशटॅग करून जरांगेंनी फेसबुकवर लिहिलं आहे. त्यामुळे आता बच्चू कडूंच्या शिष्टाईला यश येतं का ते पाहायतं, कारण गेल्या काही दिवसांपासून सरकारचे प्रतिनिधी म्हणून बच्चू कडू जरांगेंशी चर्चा करतायेत.