Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात उद्या 20 मे रोजी मतदान होत असून मुंबईसह परिसरातील एकूण 13 मतदारसंघात निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. या टप्प्यातील निवडणुकांसाठी राजकीय नेतेमंडळीही कामाला लागली आहे. मुंबईतील (Mumbai) 6 जागांवर महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार फाईट आहे. त्यामुळे, प्रत्येक हालचालीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची नजर आहे. त्यातच, मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी ऐन मतदानाच्या आदल्यादिवशी स्नेहभेट मेळाव्याचं आयोजन केल्यामुळे शिवसेनेच्या आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) संताप व्यक्त केला आहे. तसेच, हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन नाही का, असा सवालही त्यांनी केलाय.
लोढा फाउंडेशनकडून आज रात्री मंगल प्रभात लोढा यांच्या पेडर रोड येथे होत असलेल्या भेटीगाठीच्या कार्यक्रमावर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाला आचारसंहिता असताना अशाप्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन मंत्र्यांकडूनच केले जात असेल तर यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? असा सवाल आदित्य यांनी ट्विट करून निवडणूक आयोगाला विचारला आहे.