Mumbai Fire: 'ओसी नसताना गोदामं, दुकानं सुरू होती', जोगेश्वरीतील JMS Center आगीप्रकरणी मनसेचा गंभीर आरोप
Continues below advertisement
मुंबईच्या जोगेश्वरी (Jogeshwari) परिसरातील जेएमएस बिजनेस सेंटरला (JMS Business Center) लागलेल्या भीषण आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. 'या इमारतीला ओसी नसतानासुद्धा इथे गोदामं आणि दुकानं सुरू होती', असा गंभीर आरोप मनसेने (MNS) केला आहे, तर पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही आग लागल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गुरुवारी सकाळी लागलेली ही आग इमारतीच्या सातव्या मजल्यावरून दहाव्या मजल्यापर्यंत पसरली, ज्यात तीन मजले जळून पूर्णपणे खाक झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या दुर्घटनेत अडकलेल्या १६ ते १७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे इमारतींच्या सुरक्षेचा आणि प्रशासकीय परवानगीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement